blog

Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) नवरात्री हा एक धार्मिक उत्सव असून तो देवी दुर्गेच्या ९ रूपांची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. या काळात देवीच्या पुजेबरोबरच भक्तजन उपवास करुन देवीची आराधना करतात. आयुर्वेदानुसार, नवरात्रीमध्ये उपवास करण्याला बरेच महत्त्व आहे. कारण यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारते. नवरात्री ही देवी शक्तीची आराधना करताना आपलं शारीरिक बल वाढावं म्हणून उपवास योग्य पद्धतीने करायला हवा. (Navratri Fasting importance in ayurveda). या काळात, पाच तत्त्वांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. म्हणूनच नवरात्रीच्या दरम्यान, ताज्या फळांचा, शुद्ध धान्यांचा आणि भारतीय मसाल्यांचा उपयोग करुन उपवास केले जातात. हे पदार्थ शरीराची क्षमता वाढवतात आणि शक्ती देतात. याबरोबरच नवरात्रीमध्ये ध्यान केल्याने मनाची शुद्धता साधता येते. ध्यानाच्या माध्यमातून आंतरीक शांती प्राप्त करतात, ज्यामुळे आत्मज्ञान आणि आध्यात्मिक जागरूकता वाढते. ध्यानामुळे आत्मसंयम साधता येतो, ज्यामुळे नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवता येते. उपवासामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात आणि ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीरातील आत्मरक्षण शक्ती वाढते. उपवासाच्या काळात हलका आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये फळे, शेंगदाणे आणि शुद्ध धान्य यांचा समावेश असतो. हे आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार उत्तम मानले जाते. या काळात केल्या जाणाऱ्या उपवासामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो, ज्यामुळे ध्यानाची शक्ती वाढण्यास मदत होते. या पदार्थांतून मिळेल ऊर्जा 1. राजगिरा पिठ: हे पित्त आणि वात संतुलित करण्यास मदत करते. 2. सामक तांदूळ (वरई): यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्व असतात ज्यामुळे ऊर्जा मिळते. 3. सिंगा (शिंगाडा): हायड्रेटिंग गुणधर्मामुळे, हे शरीरात ताजेपणा आणते. 4. फळे: सफरचंद, केळी, पेरु आणि मोसंबी यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. लंघनाचे महत्त्व- आयुर्वेदात लंघन म्हणजे उपवास करणे किंवा हलका आहार घेणे. लंघनामुळे शरीरातील पचनक्रिया आणि विषाक्त पदार्थांचे शुद्धीकरण साधता येते. लंघनामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि शरीराची कार्यक्षमता वाढते. लंघन हे आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण यामुळे आहाराच्या आवडीनिवडीवर नियंत्रण ठेवता येते. लंघनाचे फायदे – 1. पचन सुधारते – पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. 2. विषाक्त पदार्थांचा नाश – शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. 3. ऊर्जा आणि चैतन्य वाढवते – शरीराला ऊर्जा मिळते व ताजेतवानेपणा येतो. 4. रोग निवारण – लंघनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण होते. https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।। ।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई. शाखा- मुंबई- वाशी । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. हेल्पलाइन नं: 7796775000 9422558509 9822634478 https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore